गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना
🔶️ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत राज्यातील
शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विशेषत; पाण्यात बुडवून मृत्यू होणे, कीटकनाशके हाताळताना आथवा, अन्य
कारणांमुळे होणारी विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे, उंचावरून पडुन झालेला अपघात, सर्पदंश व विनचुदंश, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा
त्याच्या चाचण्यांमुळे जखमी किवा होणारे मृत्यु , दंगल , अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यु झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
म्हणून नोंद नसलेले कोणताही 1 सदस्य ( आई , वडील, शेतकऱ्याची पती , पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे एकुण 2 जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू होते.
सदर योजनेच्या प्रयोजनारथ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले 1 सदस्याचे आई , वडील, शेतकऱ्याची पती , पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी याचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल.
🔶️ कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य असे एकुण 2 जणांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ असतील.
🔶️अपघाताची बाब
◾️अपघाती मृत्य - रूपये 2,00,000/-
◾️अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे - रू.2,00,000/-
◾️अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे.- 2,00,000/-
◾️अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे - रू 1,00,000/-

Comments
Post a Comment