गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना
🔶️ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विशेषत; पाण्यात बुडवून मृत्यू होणे, कीटकनाशके हाताळताना आथवा, अन्य कारणांमुळे होणारी विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे, उंचावरून पडुन झालेला अपघात, सर्पदंश व विनचुदंश, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्याच्या चाचण्यांमुळे जखमी किवा होणारे मृत्यु , दंगल , अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यु झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. 🔶️ अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यकरिता शासनाकडून रू.2 लाख पर्यत लाभ देण्यात येतो. सदर सुधारित योजने अंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही 1 सदस्य ( आई , वडील, शेतकऱ्याची पती , प...